Thursday, 29 October 2015

कृषि संजीवनी योजना

राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषि ग्राहकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्याकडील वीज देयकाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी कृषि संजीवनी योजनेस ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

काय आहे आहे कृषि संजीवनी योजना?
  • महाराष्ट्रात प्रथम २०११ साली कृषि संजीवनी योजना सुरु करण्यात आली.
  • योजनेंतर्गत कृषि ग्राहकांसाठी मूळ थकबाकी रकमेच्या ५0 टक्के रक्कम एक रकमी किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरल्यास उर्वरित मूळ थकबाकीच्या ५0 टक्के रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अनुदान स्वरूपात देण्यात येते. 
  • योजनेंतर्गत महावितरणतर्फे थकीत व्याज आणि दंड माफ केले जाते. 


No comments:

Post a Comment

Team MPSC Insights