Tuesday, 3 November 2015

अटल सौर कृषी पंप योजना

राज्यातील शेतकर्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी 'अटल सौर कृषी पंप योजना' राबविण्यात येणार आहे.
  • योजनेंतर्गत राज्यातील पाच लाख शेतकर्यांना सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत.
  • पहिल्या टप्प्यात दहा हजार सौर कृषी पंपाचे वाटप करण्यात येणार असून लवकरच संपूर्ण राज्यात योजनेची अंबलबजावणी केली जाणार आहे.
  • अटल सौर कृषी पंप योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी; तसेच सौर पंपांची उपयुक्तता शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रचार व प्रसार मोहीम राबवली जाणार आहे. 

महाराष्ट्र आणि केंद्र सरकार अपारंपरिक उर्जेच्या वापरला प्राधान्य देताना दिसून येत आहे.
  • महाराष्ट्र राज्याने अक्षय ऊर्जा धोरण २०१५ जाहीर केले आहे. 
  • केंद्र सरकारने नवीन धोरणानूसार २०२२ पर्यंत अक्षय ऊर्जा क्षमता १७५ GW इतके लक्ष केंद्रित केले आहे. आपण दोन्ही धोरणांनुसार लक्ष ठरविण्यात आलेल्या विविध उर्जेंचा एकत्रित विचार करुयात.
ऊर्जा
महाराष्ट्र (MW)
भारत  (GW)
सौर ऊर्जा
७५००
१००
पवन ऊर्जा
५०००
६०
लघु जलविद्युत प्रकल्प
४००
कृषी/ऊस
  आधारित वीज निर्मिती प्रकल्प
१३००
१०
औद्योगिक कचरा वीज निर्मिती
२००

एकूण ऊर्जा
१४४००
१७५

  •  GW = १००० MW

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights